spot_img
अहमदनगरशालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली 'ही' मागणी

शालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली ‘ही’ मागणी

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : 
शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास जैन समाजाने विरोध केला आहे. याबाबत जैन समाज व भाजपा जैन सेल प्रकोष्ठ रविंद्र बाकलीवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना हा जीआर रद्द करावा असे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जीआर काढून शालेय पोषण आहारात पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव, अंडी असलेली बिर्याणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने हा निर्णय अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे असे सांगितले जात आहे.

परंतु हा निर्णय जैन समाज व शाकाहारी लोकांच्या भावनांना ठेच पोहचवणारा असून पूर्ण शाकाहारी असलेल्यांना मांसाहारी बनविण्याचे षडयंत्र आहे. सरकारने सर्व जातीधर्माच्या परंपरा, धार्मिक रितीरिवाज याची दखल घेऊन जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे.

या वेळी अनिल कटारिया, महावीर बड़जाते, धीरज पोखरणा, संजय कासलीवाल, अशोक चुडीवाल, विजय खबिया, संतोष भटेवाड़ा आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात मातब्बर पुढाऱ्यांना धक्का; सरपंच पद झाले आरक्षित, या गावांत ‘महिलाराज’

सुनील चोभे / नगर सह्याद्री - थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण...

अकोळनेर नगरीत भक्तीचा महापूर; दिड लाख भाविकांना पाच लाख पुरणपोळ्याचा महाप्रसाद

जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता सुनील चोभे / नगर...

अहिल्यानगरमध्ये ऑनलाईन वेश्याव्यवसाय; पोलिसांची मोठी कारवाई..

Ahilyanagar Crime: शिर्डीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गैरकृत्याचा प्रकार सुरु होता. ओंलीने पद्धतीने बुकिंग...

जामखेडमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; अधिकाऱ्यांकडून केले असे, पहा नेमकं काय घडलं

जामखेड / नगर सह्याद्री : शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात...