spot_img
अहमदनगरशालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली 'ही' मागणी

शालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली ‘ही’ मागणी

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : 
शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास जैन समाजाने विरोध केला आहे. याबाबत जैन समाज व भाजपा जैन सेल प्रकोष्ठ रविंद्र बाकलीवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना हा जीआर रद्द करावा असे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जीआर काढून शालेय पोषण आहारात पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव, अंडी असलेली बिर्याणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने हा निर्णय अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे असे सांगितले जात आहे.

परंतु हा निर्णय जैन समाज व शाकाहारी लोकांच्या भावनांना ठेच पोहचवणारा असून पूर्ण शाकाहारी असलेल्यांना मांसाहारी बनविण्याचे षडयंत्र आहे. सरकारने सर्व जातीधर्माच्या परंपरा, धार्मिक रितीरिवाज याची दखल घेऊन जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे.

या वेळी अनिल कटारिया, महावीर बड़जाते, धीरज पोखरणा, संजय कासलीवाल, अशोक चुडीवाल, विजय खबिया, संतोष भटेवाड़ा आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...