spot_img
महाराष्ट्रराजकारणात पुन्हा ट्विस्ट ! शिंदे गटातील शिवसेनेचे 'हे' दिग्गज नेते अजित पवार...

राजकारणात पुन्हा ट्विस्ट ! शिंदे गटातील शिवसेनेचे ‘हे’ दिग्गज नेते अजित पवार गटात ?

spot_img

पुणे / नगर सह्यादी : लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. राजकारणात त्यामुळे अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

राजकीय उलथापालथीमुळे मतदारसंघांतील समीकरणे बदलली आहेत. आता आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ते शिरूर मतदार संघात येतात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात गेले. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील तीन वेळा खासदार राहिले आहेत.

पण आता या लोकसभेवर भाजपकडून दावा सांगितला जातोय. भाजप आमदार महेश लांडगे हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा कायम रंगत असते. दुसरीकडे, राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले.

सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे कोल्हे यांच्याविरोधात लढण्यासाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही विचार करू शकतात. परंतु या घडामोडींवर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...