spot_img
अहमदनगरशालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली 'ही' मागणी

शालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली ‘ही’ मागणी

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : 
शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास जैन समाजाने विरोध केला आहे. याबाबत जैन समाज व भाजपा जैन सेल प्रकोष्ठ रविंद्र बाकलीवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना हा जीआर रद्द करावा असे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जीआर काढून शालेय पोषण आहारात पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव, अंडी असलेली बिर्याणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने हा निर्णय अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे असे सांगितले जात आहे.

परंतु हा निर्णय जैन समाज व शाकाहारी लोकांच्या भावनांना ठेच पोहचवणारा असून पूर्ण शाकाहारी असलेल्यांना मांसाहारी बनविण्याचे षडयंत्र आहे. सरकारने सर्व जातीधर्माच्या परंपरा, धार्मिक रितीरिवाज याची दखल घेऊन जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे.

या वेळी अनिल कटारिया, महावीर बड़जाते, धीरज पोखरणा, संजय कासलीवाल, अशोक चुडीवाल, विजय खबिया, संतोष भटेवाड़ा आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...