spot_img
अहमदनगरशालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली 'ही' मागणी

शालेय पोषण आहारात अंडी, जैन समाज आक्रमक, मंत्री विखेंकडे केली ‘ही’ मागणी

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : 
शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास जैन समाजाने विरोध केला आहे. याबाबत जैन समाज व भाजपा जैन सेल प्रकोष्ठ रविंद्र बाकलीवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना हा जीआर रद्द करावा असे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जीआर काढून शालेय पोषण आहारात पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव, अंडी असलेली बिर्याणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने हा निर्णय अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे असे सांगितले जात आहे.

परंतु हा निर्णय जैन समाज व शाकाहारी लोकांच्या भावनांना ठेच पोहचवणारा असून पूर्ण शाकाहारी असलेल्यांना मांसाहारी बनविण्याचे षडयंत्र आहे. सरकारने सर्व जातीधर्माच्या परंपरा, धार्मिक रितीरिवाज याची दखल घेऊन जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे.

या वेळी अनिल कटारिया, महावीर बड़जाते, धीरज पोखरणा, संजय कासलीवाल, अशोक चुडीवाल, विजय खबिया, संतोष भटेवाड़ा आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...

गुन्हेगारांना अटक करुन फाशीची शिक्षा द्या; कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्‌‍याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या...

आमदार जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी; आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतला ‘हा’ निर्णय

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पक्षाचे जेष्ठ आमदार संग्राम...

पारनेरच्या डॉ. शिवाजी ठुबे यांना युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर

वनस्पती संरक्षण विज्ञानातील अतुलनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल पारनेर । नगर सहयाद्री:- राष्ट्रीय कृषी विज्ञान...