spot_img
ब्रेकिंगDiwali 2023: आज धनत्रयोदशी! झाडू खरेदीला का आहे महत्त्व?

Diwali 2023: आज धनत्रयोदशी! झाडू खरेदीला का आहे महत्त्व?

spot_img

नगर सहयाद्री टीम-

हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळी सणाला धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक महत्वाचा दिवस आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसाशी निगडित अनेक परंपरा आहेत.

धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो.

या दिवशी धन आणि समृद्धीसाठी भगवान गणेश, भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आयुर्वेदाचे हिंदू देव, भगवान धन्वंतरी यांचीही धनत्रयोदशीला पूजा केली जाते. असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा, या उद्देशाने दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे. याशिवाय या दिवशी राम वनवासातून घरी परतले होते त्यामुळे दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.

का केली जाते झाडूची पूजा?

झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. याशिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक समज आहे की, असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते असे म्हटले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...