spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना महिन्याला २ हजार देणार? काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय-काय? वाचा सविस्तर..

काँग्रेसची ‘महालक्ष्मी’ योजना महिन्याला २ हजार देणार? काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय-काय? वाचा सविस्तर..

spot_img

Politics News: महाराष्ट्रमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रे अॅक्शन मोडवर आलेय. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना आज दिल्लीत बोलवण्यात आलेय. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीमध्ये जाहीरनामा, जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे समजतेय. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठा आपला जाहीरनामा तयार केलाय. त्यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय असणार?
महाराष्ट्रासाठी महालक्ष्मी योजना
या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये मिळणार आहे.

कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं ३ लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटीची असणार

महालक्ष्मी योजना
महिलांना प्रति महिना २००० रूपये दिले जाणार आहेत. यासाठी ६० हजार कोटीचा निधी अपेक्षित आहेत.

स्री सन्मान योजना
या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पुर्णपणे मोफत दिली जाणार आहे. या योजनेसाठी १ हजार ४६० कोटीचा निधी अपेक्षित आहे.

कुटुंब रक्षण
सर्वांना २५ लाख रूपयांचं विमा कवच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ६ हजार ५५६ कोटीचा निधी अपेक्षित

युवकांना शब्द
बेरोजगारांना महिन्याला ४ हजार रूपये दिले जातील. साधारण ६.५ लाख युवकांना हा भत्ता दिला जाणार

समतेची हमी
दलित, अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना राबवल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत साधारण ८.५ कोटी लोकांना फायदा होईल, असा दावा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...