spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

spot_img

भंडारा:नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या काहीच महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, लोकसभेत आपण सारे भाऊ-भाऊ म्हणणारे नेते आता वेगवेगळी विधानं करताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु केली असल्याचं सूचक वक्तव्य पटोलेंनी केलं आहे.

महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागांवर काँग्रेसने तयारी सुरु केली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेत काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र येत निवडणूक लढवली. या निवडणुकीत सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडणूक आले. तर राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३० खासदार जिंकले. त्यामुळे येत्या विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी शक्यता होती. पण, आता महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळी विधानं करताना दिसून येत असल्याने विधानसभेचा सस्पेन्स वाढत चालला आहे.

तर, तिकडे महविकास आघाडीतीलच उद्धव ठाकरेंची शिवसेनाही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांचं स्क्रिनिंग सुरु केलं आहे. तसेच, ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांकडून त्यांच्या त्यांच्या विभागातील अहवालही मागवला आहे. ठाकरेंकडून सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिशिदीत स्फोट; महाराष्ट्रात भयंकर प्रकार..

Maharashtra Crime News: मशीद स्फोटप्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विजय गव्हाणे आणि...

शिर्डी विमानतळावर होणार नाईट लॅण्डिंग!

हैदराबादहून आलेल्या प्रवाशांचे प्राधिकरणाच्यावतीने प्रवाशांचे स्वागत शिर्डी | नगर सह्याद्री राज्यात कमी कालावधीत सर्वाधिक वेगवान ठरलेल्या...

‘अहिल्यानगरमध्ये रमजान ईद उत्साहात’

हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा; एकात्मता व शांततेसाठी प्रार्थना अहिल्यानगर ।...

शासनाकडे ‘ती’ सेवा बळकट करण्यासाठी पाठपुरावा करणार;आमदार जगताप यांची मोठी माहिती

शीघ्र प्रतिसाद वाहनाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण अहिल्यानगर...