spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

spot_img

भंडारा:नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या काहीच महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, लोकसभेत आपण सारे भाऊ-भाऊ म्हणणारे नेते आता वेगवेगळी विधानं करताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु केली असल्याचं सूचक वक्तव्य पटोलेंनी केलं आहे.

महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागांवर काँग्रेसने तयारी सुरु केली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेत काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र येत निवडणूक लढवली. या निवडणुकीत सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडणूक आले. तर राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३० खासदार जिंकले. त्यामुळे येत्या विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी शक्यता होती. पण, आता महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळी विधानं करताना दिसून येत असल्याने विधानसभेचा सस्पेन्स वाढत चालला आहे.

तर, तिकडे महविकास आघाडीतीलच उद्धव ठाकरेंची शिवसेनाही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांचं स्क्रिनिंग सुरु केलं आहे. तसेच, ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांकडून त्यांच्या त्यांच्या विभागातील अहवालही मागवला आहे. ठाकरेंकडून सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...