spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

spot_img

भंडारा:नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या काहीच महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, लोकसभेत आपण सारे भाऊ-भाऊ म्हणणारे नेते आता वेगवेगळी विधानं करताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु केली असल्याचं सूचक वक्तव्य पटोलेंनी केलं आहे.

महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागांवर काँग्रेसने तयारी सुरु केली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेत काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र येत निवडणूक लढवली. या निवडणुकीत सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडणूक आले. तर राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३० खासदार जिंकले. त्यामुळे येत्या विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी शक्यता होती. पण, आता महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळी विधानं करताना दिसून येत असल्याने विधानसभेचा सस्पेन्स वाढत चालला आहे.

तर, तिकडे महविकास आघाडीतीलच उद्धव ठाकरेंची शिवसेनाही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांचं स्क्रिनिंग सुरु केलं आहे. तसेच, ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांकडून त्यांच्या त्यांच्या विभागातील अहवालही मागवला आहे. ठाकरेंकडून सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...