spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

spot_img

भंडारा:नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या काहीच महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, लोकसभेत आपण सारे भाऊ-भाऊ म्हणणारे नेते आता वेगवेगळी विधानं करताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु केली असल्याचं सूचक वक्तव्य पटोलेंनी केलं आहे.

महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागांवर काँग्रेसने तयारी सुरु केली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेत काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र येत निवडणूक लढवली. या निवडणुकीत सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडणूक आले. तर राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३० खासदार जिंकले. त्यामुळे येत्या विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी शक्यता होती. पण, आता महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळी विधानं करताना दिसून येत असल्याने विधानसभेचा सस्पेन्स वाढत चालला आहे.

तर, तिकडे महविकास आघाडीतीलच उद्धव ठाकरेंची शिवसेनाही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांचं स्क्रिनिंग सुरु केलं आहे. तसेच, ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांकडून त्यांच्या त्यांच्या विभागातील अहवालही मागवला आहे. ठाकरेंकडून सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार दाते यांनी पारनेरचे मुद्दे गाजवले!, विधानसभेत पोलिसांच्या शौर्याचा गौरव करत केली मोठी मागणी..

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे...

राज्यात मेगा भरती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूत कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे....

नगर-पुणे प्रवास होणार दीड तासात; नवा रेल्वे मार्ग..

पुणे । नगर सहयाद्री:- बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर...

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....