spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! कंपनीत विषारी वायू, एकाचा मृत्यू दोन कामगार अत्यावस्थ, अहमदनगर...

मोठी बातमी ! कंपनीत विषारी वायू, एकाचा मृत्यू दोन कामगार अत्यावस्थ, अहमदनगर जवळील घटना

spot_img

बारामती / नगर सह्याद्री : कंपन्यांमधील विषारी वायूमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना काही नवीन नाहीत. आता एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर जवळील दौंड तालुक्यात ही घटना घडली आहे. येथील एका कंपनीत रासायनिक विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांची प्रकृती अत्यावस्थ आहे.

असल्याची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे ही घटना घडली असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनीत गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने परिसरात विषारी वायू तयार झाला. या विषारी वायुच्या संपर्कात आल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीत ऍसिड ड्रम अचानक पलटी झाल्याने कंपनीत अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी कामगारांनी तातडीने अग्निबंबाचा वापर केला. ही आग विझवताना मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाका तोंडात गेला होता.

घटनेदरम्यान, कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. मात्र संध्याकाळी कामगार घरी गेल्यानंतर 3 कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामधील एकाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. अमोल चौधरी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर दोन कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...