spot_img
अहमदनगरकाळजी घ्या! बदलत्या हवामानामुळे रुग्णांमध्ये वाढ

काळजी घ्या! बदलत्या हवामानामुळे रुग्णांमध्ये वाढ

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
अचानक उष्णता वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतातील मालावर व फळबागावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी वारा व वादळ झाल्यानंतर दोन-तीन दिवस हवेत अल्हादायक गारवा निर्माण झाला होता त्यामुळे नागरिक सुखावले होते मात्र मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे अचानक उष्णता वाढली आहे.

तापमान वाढल्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. संपूर्ण आभाळ भरल्यामुळे केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. असंतुलित हवामानामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा बागायतदारही हवालदील झाला आहे. दिवसा व रात्री हवेत उष्णता जाणवत आहे तर दिवसभर नागरिक घामांच्या धारांमध्ये भिजून निघत आहे.

परिणामी नागरिक उखाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक ताप, सर्दी, खोकला आधी आजारांपासून त्रस्त आहेत . श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक तापमानातील बदलामुळे व तसेच अधून मधून हवामानात बदल होत असल्यामुळे गेली काही दिवस खाजगी दवाखान्यात, ग्रामीण रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला, यासारख्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे‌.

आरोग्याची काळजी घ्या
उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने बहुतांश नागरिकांना थकवा जाणवत आहेत तर काहींना उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे .शारीरिक थकव्यामुळे पायाला गोळे येत आहेत .जेवण कमी होते .काही खाऊ वाटत नाही त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा दुपारचा प्रवास टाळावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे यामुळे उष्णतेपासून पासून बचाव होऊन शारीरिक व्याधींपासून सुरक्षा होऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...