spot_img
अहमदनगरकाळजी घ्या! बदलत्या हवामानामुळे रुग्णांमध्ये वाढ

काळजी घ्या! बदलत्या हवामानामुळे रुग्णांमध्ये वाढ

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
अचानक उष्णता वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतातील मालावर व फळबागावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी वारा व वादळ झाल्यानंतर दोन-तीन दिवस हवेत अल्हादायक गारवा निर्माण झाला होता त्यामुळे नागरिक सुखावले होते मात्र मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे अचानक उष्णता वाढली आहे.

तापमान वाढल्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. संपूर्ण आभाळ भरल्यामुळे केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. असंतुलित हवामानामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा बागायतदारही हवालदील झाला आहे. दिवसा व रात्री हवेत उष्णता जाणवत आहे तर दिवसभर नागरिक घामांच्या धारांमध्ये भिजून निघत आहे.

परिणामी नागरिक उखाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक ताप, सर्दी, खोकला आधी आजारांपासून त्रस्त आहेत . श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक तापमानातील बदलामुळे व तसेच अधून मधून हवामानात बदल होत असल्यामुळे गेली काही दिवस खाजगी दवाखान्यात, ग्रामीण रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला, यासारख्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे‌.

आरोग्याची काळजी घ्या
उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने बहुतांश नागरिकांना थकवा जाणवत आहेत तर काहींना उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे .शारीरिक थकव्यामुळे पायाला गोळे येत आहेत .जेवण कमी होते .काही खाऊ वाटत नाही त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा दुपारचा प्रवास टाळावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे यामुळे उष्णतेपासून पासून बचाव होऊन शारीरिक व्याधींपासून सुरक्षा होऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...