spot_img
अहमदनगरAhmednagar News : पारनेरमध्ये भाजप प्रबळ होणार ! मंत्री राधाकृष्ण विखे म्हणतात..

Ahmednagar News : पारनेरमध्ये भाजप प्रबळ होणार ! मंत्री राधाकृष्ण विखे म्हणतात..

spot_img

निघोज / नगर सह्याद्री : राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी निघोज पंचायत समिती गणात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. पक्षाने एक कार्यक्षम नेतृत्व म्हणून पारनेर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

या पदाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करत ते भाजपा पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही   महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. मंत्री  विखे पाटील यांच्या हस्ते पारनेर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुखदेव पवार, दत्ता पवार आदी उपस्थित होते.

विखे पाटील यांनी यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचेही कौतुक केले. शिंदे  यांनी तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून चांगले संघटन केले असून पंकज कारखिले, दत्ता  पवार आदी असंख्य युवकांची साथ त्यांना मिळणार असल्याने पारनेर तालुक्यात भाजप एक प्रबळ पक्ष म्हणून नावारूपाला येईल असे ते म्हणाले.  पंकज कारखिले यावेळी म्हणाले विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत खा. सुजय विखे पाटील यांना पारनेर तालुक्यातील जनता विक्रमी मताधिक्य देईल अशी ग्वाही कारखिले यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...