spot_img
अहमदनगरAhmednagar News : विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

Ahmednagar News : विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील धनगर मेंढपाळ संतोष काळूराम बरकडे यांच्या १७० मेंढ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्या दगावल्याची घटना मंगळवारी (दि.३० जानेवारी) दुपारी घडली. या घटनेत या शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील संतोष काळूराम बरकडे हे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तेथे मंगळवारी दुपारी १७० मेंढ्यांना अन्नामधून विषबाधा होऊन त्या मृत्युमुखी पडल्या. अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत.

त्यामुळे मृत मेंढ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटातून बाहेर काढण्यास सर्वांनी एकजुटीने मदत केली करावी, तसेच या कुटुंबाला सरकारकडूनही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...