spot_img
ब्रेकिंगMaratha reservation: २४ तारखेनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल! मनोज...

Maratha reservation: २४ तारखेनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल! मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
Maratha reservation:मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) पाचव्या टप्यातील दौर्‍याला सुरवात करत आहेत. या दौर्‍यानिमित्त त्यांनी बोलताना मराठा समाजाला जो संघर्ष करावा लागत आहे तो कुठं तरी थांबला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.

सरकार आणि मुख्यमंत्री काय मांडतात त्याचा निर्णय २४ तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे २४ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणार असल्याचा इशारा मनोज पाटील जरांने पाटील यांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. यावर विरोधी पक्षाकडून आचारसंहिता लागणार असल्याने विशेष अधिवेशन कसं बोलवणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका तर झाल्या पाहिजे ना? त्यामुळे आचासंहिता लागणार कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणारच, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यावर समाजाने विश्वास टाकला त्यांच्या शब्दाचा सन्मान केला. आता त्यांनी समाजाचा सन्मान करावा. त्यांनी काल आरक्षणाचा विषय पटलावर मांडला त्यात एक दोन शब्द ते विसरले त्या बाबत ही ते स्पष्ट करतील, असं जरांगे पाटील म्हणाले.

सरकार सरकारचे काम करत आहे. आम्ही आमचे काम सुरूच ठेवले आहे. मागचे अनुभव आणि घोषणा पाहता आम्ही उड्या मारणार नाही. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू जे न पटणारं असेल त्याला विरोध करू. त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री काय मांडतात त्याचा निर्णय २४ तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे २४ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणारच असल्याचा इशारा, मनोज पाटील जरांने पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...