spot_img
देशलोकसभेपूर्वी राजकीय भूकंप? 'बड्या' मंत्र्यानी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

लोकसभेपूर्वी राजकीय भूकंप? ‘बड्या’ मंत्र्यानी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

spot_img

नवी लिद्ली | वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हरियाणातील सत्ताधारी भाजपा व जेजेपी यांच्यातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे.

ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत थेट मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या राजीनाम्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील लोकसभा निवडणूक जागावाटप कारणीभूत ठरल्याचे बोललं जात आहे. मनोहर लाल खट्टर व त्यांच्या मंत्र्यांनी आज सकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा सादर केला.

विशेष म्हणजे हरियाणा मंत्रीमंडळाचा विस्तार बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय जनता पक्ष व जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रीमंडळ विस्तार व नंतर लोकसभेसाठीचं जागावाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, हरियाणातील आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल होणार, अशी चर्चा आहे. यामध्ये जेजेपी पक्षाच्या एकाही आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नसून भाजपा अपक्ष आमदारांचा सरकारसाठी पाठिंबा घेऊ शकते. त्यासाठी काही अपक्षांना मंत्रीपदही दिलं जाण्याची शयता आहे.

जागावाटपाचा तिढा!
दरम्यान, भाजपा व जेजेपी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकासाठीच्या जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला होता. यासंदर्भात जेजेपी नेते व उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी दिल्लीत भेट घेतली असता त्यावेळी त्यांना हरियाणामध्ये एकही जागा दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जेजेपीची दोन जागांची मागणी असताना भाजपानं मात्र सर्व १० जागा लढवण्याची तयारी केली आहे. जेजेपीला हरियाणातील हिसार व भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघ हवे होते. मात्र, भाजपानं सर्व जागा लढवणार असल्याचं पक्षातील वरीष्ठांना कळवलं आहे. तसेच, संभाव्य उमेदवारांची यादीही भाजपाकडून तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदारांनीच कानफाड सुजवले असेल तर…!

आग लागली म्हणून तर धूर निघाला! मार देणाऱ्याने आणि खाणाऱ्याने इन्कार केला असला तरी...

खासदारांनीच कानफाड सुजवले असेल तर…!

आग लागली म्हणून तर धूर निघाला! मार देणाऱ्याने आणि खाणाऱ्याने इन्कार केला असला तरी...

शिवसेना-मनसे युतीला ब्रेक?, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना महत्वाचा आदेश

मुंबई | नगर सहयाद्री  कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे...

अभिनेत्री श्वेता तिवारीच दुसरं लग्न मोडलं; कारण आलं समोर..

मुंबई । नगर सहयाद्री लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते....