spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग : 'या' गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने केली तोडफोड,...

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने केली तोडफोड, जाळपोळ

spot_img

नगर सह्याद्री / राहाता
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. 400 ते 500 लोकांच्या जमावाने दोन कुटुंबाना टार्गेट करत तोडफोड, जाळपोळ केली आहे. 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

अधिक माहिती अशी : सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये पिंपरी निर्मळ गावातील तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर गाव पातळीवर या दोन गटांमध्ये पोलिसांच्या सहकार्याने वादावर पडदा टाकण्यात आला. परंतू बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्री या मागील भांडणाच्या कारणावरून गावातील संतप्त झालेल्या एका गटाच्या 400 ते 500 जणांच्या जमावाने दोन घरांना लक्ष करीत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले.

या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले. याप्रकरणी शारदा सुधाकर कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात सुनील घोरपडे, सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे,

नारायण घोरपडे, सोमनाथ घोरपडे, वनिता घोरपडे, शिवनाथ घोरपडे, शुभम घोरपडे, रोहन निर्मळ, संजय कदम, नंदू निर्मळ, संदीप घोरपडे, कैलास घोरपडे, नितीन घोरपडे, दिपक निर्मळ आदींसह 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...