spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग : 'या' गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने केली तोडफोड,...

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने केली तोडफोड, जाळपोळ

spot_img

नगर सह्याद्री / राहाता
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. 400 ते 500 लोकांच्या जमावाने दोन कुटुंबाना टार्गेट करत तोडफोड, जाळपोळ केली आहे. 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

अधिक माहिती अशी : सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये पिंपरी निर्मळ गावातील तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर गाव पातळीवर या दोन गटांमध्ये पोलिसांच्या सहकार्याने वादावर पडदा टाकण्यात आला. परंतू बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्री या मागील भांडणाच्या कारणावरून गावातील संतप्त झालेल्या एका गटाच्या 400 ते 500 जणांच्या जमावाने दोन घरांना लक्ष करीत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले.

या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले. याप्रकरणी शारदा सुधाकर कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात सुनील घोरपडे, सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे,

नारायण घोरपडे, सोमनाथ घोरपडे, वनिता घोरपडे, शिवनाथ घोरपडे, शुभम घोरपडे, रोहन निर्मळ, संजय कदम, नंदू निर्मळ, संदीप घोरपडे, कैलास घोरपडे, नितीन घोरपडे, दिपक निर्मळ आदींसह 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! विकासकामांचे ४५ बनावट जीआर; कोट्यवधींचा पर्दाफाश; नगरमध्ये चाललंय काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासकीय यंत्रणेमध्ये वारंवार विविध घोटाळे, भ्रष्टाचार समोर येत असतानाच आता...

आमदार दाते यांनी पारनेरचे मुद्दे गाजवले!, विधानसभेत पोलिसांच्या शौर्याचा गौरव करत केली मोठी मागणी..

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे...

खुशखबर! राज्यात मेगा भरती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूत कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे....

नगर-पुणे प्रवास होणार दीड तासात; नवा रेल्वे मार्ग..

पुणे । नगर सहयाद्री:- बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर...