spot_img
राजकारण''जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड...

”जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी…” शालिनीताई पाटील यांचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या राजकारणात विविध रंग दिसत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित दादा व शरद पवार हे एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

काल (२४ डिसेंबर) अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वसंतदादांच्या पार्श्वभूमीवर घणाघात केला होता. आता त्याच अनुशंघाने शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

काय म्हणाल्या शालिनीताई पाटील
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये मोठा फरक आहे. शरद पवार यांनी पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी बंड केले होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते असे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलीये.

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात करतो त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या म्हणाल्या. अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले असून त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आम्ही कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...