spot_img
राजकारण''जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड...

”जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी…” शालिनीताई पाटील यांचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या राजकारणात विविध रंग दिसत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित दादा व शरद पवार हे एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

काल (२४ डिसेंबर) अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वसंतदादांच्या पार्श्वभूमीवर घणाघात केला होता. आता त्याच अनुशंघाने शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

काय म्हणाल्या शालिनीताई पाटील
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये मोठा फरक आहे. शरद पवार यांनी पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी बंड केले होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते असे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलीये.

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात करतो त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या म्हणाल्या. अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले असून त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आम्ही कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...