spot_img
राजकारण''जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड...

”जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी…” शालिनीताई पाटील यांचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या राजकारणात विविध रंग दिसत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित दादा व शरद पवार हे एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

काल (२४ डिसेंबर) अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वसंतदादांच्या पार्श्वभूमीवर घणाघात केला होता. आता त्याच अनुशंघाने शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

काय म्हणाल्या शालिनीताई पाटील
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये मोठा फरक आहे. शरद पवार यांनी पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी बंड केले होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते असे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलीये.

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात करतो त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या म्हणाल्या. अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले असून त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आम्ही कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...