spot_img
अहमदनगरहनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणारे लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात...

हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणारे लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते?

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री –

हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणा-या निलेश लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते? असा सवाल पारनेर नगर प‍ंचायतीचे माजी नगराध्‍यक्ष विजय औटी यांनी उपस्थित केला.

या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात विजय औटी यांनी म्‍हटले आहे की, ज्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात कोव्‍हीड संकटात जाणीवपुर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्‍या भावनांशी खेळ केला गेला तेव्‍हा निलेश लंके शब्‍दानेही बोलले नाहीत. कोव्‍हीड सेंटरमध्‍ये किर्तनाचे कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावेत म्‍हणून आग्रही का राहीले नाहीत?

हनुमान चालीसा म्‍हटली म्‍हणून आ.राणा दांम्‍पत्‍यांना जेलमध्‍ये टाकेले तेव्‍हा लंके यांची हनुमान भक्‍ती कुठे गेली होती. पालघर मध्‍ये दोन साधुंची हत्‍या झाली तेव्‍हाही लंके काही बोलले असे आठवत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांच्‍या अस्तित्‍वावर कोर्टात प्रश्‍न उपस्थित करणा-या कॉग्रेस पक्षाचे पाठबळ घेवून लंके आज उमेदवारी करतात. लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्‍याची भूमिका महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना मान्‍य आहे का? असा प्रश्‍नाही विजय औटी यांनी उपस्थित केला.

हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहुन अर्ज दाखल करण्‍याची लंके यांची नौंटकी ही केवळ सहानुभूती निळविण्‍यासाठी असली तरी, त्‍यांच्‍या नौंटकीला समाज मुलनार नाही. गदा नाचवली म्‍हणून कोणी पहीलवान होत नाही असा टोला लगावतानाच महाविकास आघडीचा जनाधार संपल्‍यामुळेच आता देव देवतांची आठवण होवू लागील असल्‍याचे औटी यांनी आपल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....