spot_img
महाराष्ट्रदंगली झाल्या तर जबाबदार कोण? अजित पवारांनी मनोज जरांगे यांचे टोचले कान…आरक्षणासंदर्भात...

दंगली झाल्या तर जबाबदार कोण? अजित पवारांनी मनोज जरांगे यांचे टोचले कान…आरक्षणासंदर्भात प्रथमच भूमिका

spot_img

कर्जत / नगर सह्याद्री : राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाबाबत वातावरण ढवळले आहे. एकीकडे मराठा समाजाची आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. दुसरीकडे मंत्री भुजबळ हे ओबीसींच्या सभा घेत याला विरोध करत आहेत. आता अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रथमच रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. त्यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कान टोचले. कर्जत मध्ये ते बोलत होते.

अजित पवार नेमकं काय म्हणाले
जातीचा अभिमान जपला पाहिजे. पण इतर जातींबद्दल द्वेष बाळगू नका. समाजाचा प्रश्न सोडवताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. काळाच्या ओघात एखादा समाज मागे पडला असेल तर तो तपासायला वेळ लागतो. मराठा समाजात आरक्षण देताना इम्पिरिकल डेटा महत्त्वाचा असतो.

त्याशिवाय आरक्षण टिकत नाही. हे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व्हायला हवी असे ते म्हणाले. सध्या जाती जातीत भांडणे उभी राहिली ते महाराष्ट्राच्या हिशोबाने दुर्देवी आहे. शिवाजी महाराजांनी १८ पगडा जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले.

पण आज महाराष्ट्रात काय सुरु आहे? त्यांचा स्वप्नातील महाराष्ट्र हाच आहे का? आपली मुले शिकावी हे प्रत्येक आई-बापाचे स्वप्न असतेच परंतु इतरांचे पोर शिकू नये हि विचारधारा काही कामाची नाही. आज महाराष्ट्रात चिथावणी करणारे भाषणे होत आहे हे थांबले पाहिजे, जर महाराष्ट्रात दंगली झाल्या तर यास जबाबदार कोण असेल असा सवालही त्यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...