spot_img
राजकारणमहाराष्ट्रात लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजपचे राजकीय गणिते सफल होणार?...

महाराष्ट्रात लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजपचे राजकीय गणिते सफल होणार? पहा ताजा सर्व्हे

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता लोकसभा निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. भाजप सध्या एकहाती सत्ता घेण्यासाठी कंबर कसत आहे. मागील दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत भाजपने मिळवले होते.

आता भाजप विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं,

याबाबत टाइम्स नाऊ आणि इटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्व्हे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबतही अंदाज सांगितला गेला आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे. टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास ४८ जागांपैकी महायुतीला २७ ते ३१ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना धक्का!; नागवडेंच्या हाती मशाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये अनेक राजकीय उलटफेर होत आहेत. काही...

सहा खात्याच्या राज्यमंत्रीपदातून वाडा भरवला; आ. प्राजक्त तनपुरेंच्या विरोधात राहुरीकरांची पश्चातापाची भावना

राहुरी | नगर सह्याद्री:- कोणताही जनसंपर्क नसताना फक्त तनपुरेंच्या घरात जन्म आणि मामाची फिल्डींग यातून...

संदीप कोतकर थांबणार? दोन दिवसात भूमिका जाहीर करणार!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहर विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत माजी महापौर संदीप कोतकर हेच...

भाजप पक्षश्रेष्ठींना यश! कोल्हे यांची निवडणुकीतून माघार? ‘ती’ पोस्ट चर्चत; “कुछ पल के अंधेरे का अंत…”

कोपरगाव । नगर सहयाद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारीसाठी आर्ज दाखल करण्यासाठी...