spot_img
ब्रेकिंग'मॉन्सून' ची स्वारी कधी येणार? हवामान खात्याने दिले 'मोठे' संकेत, वाचा सविस्तर..

‘मॉन्सून’ ची स्वारी कधी येणार? हवामान खात्याने दिले ‘मोठे’ संकेत, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘मॉन्सून’ चे महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहे. गोव्यात दाखल होत मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून १० जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.

कालपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. पुढील चार दिवसात कोकणातील राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारांचा पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट

कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगनर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...