spot_img
देश'सर्वोच्च' निकालाचे स्वागत! अदानी यांची पोस्ट चर्चेत, 'या' प्रकरणात दिलासा

‘सर्वोच्च’ निकालाचे स्वागत! अदानी यांची पोस्ट चर्चेत, ‘या’ प्रकरणात दिलासा

spot_img

नवी दिल्ली-
अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. ३) निकाल दिला आणि सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयाने अदानी समूहाला मोठा दिलासा दिला. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने सेबीच्या तपासाला न्याय दिला आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेबीला तीन महिन्यांची मुदत दिली आहे, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये आपला निर्णय राखून ठेवला होता.

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर निकाल देताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सांगितले, की सेबीने तपासात कोणतीही अनियमितता उघड केलेली नाही. २४ प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते. दोन प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे, जो सेबीला तीन महिन्यांत करण्यास सांगितले आहे. यापूर्वी २४ नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने बाजार नियामक सेबी आणि तज्ज्ञ समितीच्या तपासावर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न फेटाळून लावत निर्णय राखून ठेवला होता.

दरम्यान, आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न फेटाळून लावले. हितसंबंधांच्या संघर्षाचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद निरर्थक असल्याचे म्हटले. ठोस कारणाशिवाय सेबीकडून तपास हस्तांतरित करण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे सेबीच्या तपासावर शंका करणे किंवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नाही.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी, हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगपती गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यात अनेक गंभीर आरोप केले. अदानी समूहाने अहवाल पूर्णपणे खोटा सांगत आरोप फेटाळून लावले. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आणि त्यांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यावर वर्षभरात न्यायालयाने निकाल दिला आहे.

अदानींची पोस्ट चर्चेत

गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर काही मिनिटांत त्यांनी पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की सत्याचा विजय झाला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की, सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा मी ऋणी आहे. भारताच्या विकासात आमचे योगदान कायम राहील, जय हिंद.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...