spot_img
अहमदनगरकोटींची बिले थकली? ठेकेदारानी दिला मोठा इशारा, अत्ता शहरात 'ती' सुविधा होणार..

कोटींची बिले थकली? ठेकेदारानी दिला मोठा इशारा, अत्ता शहरात ‘ती’ सुविधा होणार..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
शासनाकडून वित्त आयोगाचे अनुदान अद्याप आलेले नाही. वसूली ठप्प असल्याने मनपाकडेही पैसे नाहीत. परिणामी, शहरात कचरा संकलन करणार्‍या श्रीजी एजन्सी या संस्थेची चार महिन्यांची बिले, तीन महिन्यांच्या बीलातील राखीव रक्कम व वाहन दुरुस्तीच्या खर्चाची एकूण पाच कोटी रुपयांची बिले थकली आहेत. आर्थिक अडचणीमुळे काम सुरू ठेवणे शय नाही, घंटा गाड्यांसाठी डीझेलही मिळणे मुश्कील झाल्याचे सांगत तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास १० मार्चपासून शहरातील कचरा संकलनाचे काम बंद करणार असल्याचे ठेकेदार संस्थेने जाहीर केले आहे.

शहरात सध्या ९० गाड्यांद्वारे घरोघरी, हॉटेलमधून, कचरा कुंड्यांमधून कचरा संकलन केले जाते. या कामाची नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची सुमारे चार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. तसेच यापूर्वीच्या बिलातील सुमारे ६० लाख रुपये थकीत आहेत. मनपाच्या वाहनांच्या दुरुस्ती खर्चाचे सुमारे ४५ लाख रुपये थकीत आहेत. मागील महिन्यात मनपाकडून अवघे ७० लाख रुपये अदा झाले.

मात्र, अद्यापही ५ कोटींची बिले थकीत असल्याने कचरा संकलन व्यवस्थेवर, कर्मचार्‍यांच्या पगारावर होणारा दैनंदिन खर्च होऊ शकत नाही. त्यामुळे १० मार्चपासून शहरातील सर्व कचरा संकलन सेवा बंद करण्यात येणार असल्याचे श्री जी एजन्सी च्यावतीने मनपाला कळवण्यात आले आहे. दरम्यान, मनपाकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरात कचरा संकलन ठप्प होऊन कचरा कोंडी होण्याची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...