spot_img
महाराष्ट्रलग्नासाठी जाणाऱ्या कारचा अपघात, तिघांचा मृत्यू

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा अपघात, तिघांचा मृत्यू

spot_img

गोंदिया / नगर सह्याद्री : लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या तवेरा गाडीला अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

लग्नाची वरात घेऊन जात असताना हा अपघात झाला असून अपघातामधील जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या एकोडी दांडेगाव याठिकाणी हा अपघात झाला. हे सगळे गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी इथं जात होते. यावेळी दांडेगावच्या चौकात ही घटना घडली.

या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर गंगाझरी पोलीस घटना स्थळी झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसात अपघतांची संख्या वाढीस लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...