spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : कारखान्‍यातील ‘सरपण’ ज्‍यांना पुरले नाही त्‍यांच कौतुक नको..कोल्हे-थोरातांवर मोठा...

Ahmednagar Politics : कारखान्‍यातील ‘सरपण’ ज्‍यांना पुरले नाही त्‍यांच कौतुक नको..कोल्हे-थोरातांवर मोठा घणाघात

spot_img

राहाता / नगर सह्याद्री :
Ahmednagar Political News : संगमनेर आणि संजीवनीने गणेश परिसरातील ऊस लुटून नेला तेव्‍हा बघ्‍याची भूमिका का घेतली? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र लहारे यांनी केला आहे. कारखान्‍यातील ‘सरपण’ ज्‍यांना पुरले नाही त्‍यांच्‍या कौतुकाचे गोडवे गाण्‍यापेक्षा गणेश कारखान्यात गुंवणूक करण्याचा आग्रह थोरात आणि कोल्हेंकडे धरावा असे आवाहनही त्‍यांनी मंत्री सखे यांच्यावर टीका करणाऱ्यांना केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात लहारे यांनी म्‍हटले आहे की, गणेश कारखाना बंद पडल्‍यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरश: लुटून नेला तेव्‍हा आपल्‍या नेत्‍यांना गणेश कारखान्‍याची काळजी वाटली नाही. तुम्ही देखील पाहत राहिलात. तुमच्‍या नेत्यांच्या कार्यकर्तृत्‍वामुळेच बंद पडलेल्‍या गणेश कारखान्‍यातील कामगार आणि ऊस उत्‍पादकांची वाताहत झाली,

कारखान्‍यावर ७५ कोटींहून अधिक रक्‍कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला? कामगारांच्‍या ४२ महिन्‍यांच्‍या पगाराचे काय झाले? काळाकुट्ट आंधार ज्यांनी गणेश कारखान्याच्या नशिबी आणला याचे दुःख सुज्ञ सभासदांना आणि कामगारांना अजूनही आहे. त्यामुळे आम्ही आनंद देत असल्याची तुमच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे ‘बडा घर पोकळ वासा’ असल्याचा टोला लहारे यांनी लगावला.

बंद पडलेला कारखाना कोल्‍हे पॅटर्नने तुमचे नेते सुरु करु शकले असते, परंतू कारखाना पुन्‍हा सुरु व्‍हावा ही इच्‍छाच नव्‍हती. उलट कोल्हे पॅटर्न सभासदांच्या माथी मारून सभासदांना दोन वर्षे भाव कमी घ्यायला लावला. कामगारांना २० टक्के पगार कमी दिले आणि कारखाना बंद पाडल्यानंतर मशिनरी खोलून कोणी नेले याचा सोयीस्कर विसर तुम्हाला आता पडला असल्याचे लहारे म्हणाले.

कारखाना सुरू होण्यापेक्षाही कार्यक्षेत्रातील ऊसावर संगमनेर आणि संजीवनीचा अधिक डोळा होता. त्‍यामुळे गणेश कारखान्‍यावरील तुमच्या नेत्यांचे  बेगडी प्रेम उघड झाले. आज तुमच्‍या नेत्‍यांनी गणेश कारखान्याच्या बाबतीत कळवळा दाखविण्‍यास केलेली सुरुवात ही सभासदांच्‍या डोळ्यात धुळफेकच असल्याची टिका करून, संगमनेर आणि संजीवनीच्‍या नेत्‍यांच्‍या कौतुकाचे गोडवे तुम्‍ही गात असला

तरी, त्‍यांनी कारखाना चालविण्‍यासाठी स्‍वत:ची किती गुंतवणूक केली याचे आकडे एकदा जाहीर करा असे आवाहन लहारे यांनी दिले. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी २३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना अद्यावत केला.करारात नसतानाही १ हजार निवृत कामगारांना ११ कोटी रुपयांची देणी अदा केली.

विखेंच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षे गणेश कारखाना यशस्‍वीपणे सुरु राहीला. आधूनिकीकरण करुन गाळप क्षमताही ३ हजार टनापर्यंत नेली. संचालक मंडळाच्‍या निवडणूकीत मिळालेल्‍या विजयाने फार हुरळून जावू नका. कारण २०११-१२ या तुमच्या नेत्यांच्या कार्यकाळातील फरकाचे पेमेंट २ कोटी रुपये अद्यापही ऊस उत्पादकांना मिळालेले नाहीत अशी आठवण लहारे यांनी पत्रकात करून दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या...