spot_img
आरोग्यअंजीर सारखं दिसणार 'हे' रानटी फळ गुणकारी!! 'या' आजारांसाठी फायदेशीर

अंजीर सारखं दिसणार ‘हे’ रानटी फळ गुणकारी!! ‘या’ आजारांसाठी फायदेशीर

spot_img

नगर सहयाद्री टीम-
उत्तम आरोग्यासाठी आहारात पाले भाज्यांइतकेच फळांनाही महत्त्व आहे. बदलत्या ऋतूनुसार फळेही बदलत जातात. फळे शरीराला अनेक जीवनसत्त्वे, भरपूर पाणी आणि फायबर प्रदान करतात. आंबा, केळी, द्राक्ष, डाळींब असे मुख्य फळ पाहिली असाल परंतु तुम्ही ‘तिमला’ नावाचे फळ कधी पहिले का? उत्तराखंडच्या डोंगररांगांमध्ये हे फळ पहावयास मिळते. तिमला ही अंजीराची जंगली प्रजाती आहे. अंजीर हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक फळ मानले जाते.

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात हे फळ तिमल, तिमिल, तिमालू या नावांनी ओळखले जाते. या भागात या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. याचे औषधी उपयोगही आहेत. या फळामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि बी असतात. या फळाची भाजी किंवा लोणचे तयार केले जाते. एप्रिल ते जून या कालावधीत या भागात हे फळ उपलब्ध असते. हिरवी पिवळी, लाल शिजवलेले तिमला फळ खूप गोड असते. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात याची भाजी आणि रायतान खूप लोकप्रिय आहेत.

या फळात औषधी गुणधर्म आहेत. आंबा आणि सफरचंदच्या तुलनेत या फळामध्ये चरबी, प्रथिने, फायबर आणि खनिजे जास्त असतात. ८३ टक्के साखर असते, ज्यामुळे ते जगातील सर्वात गोड फळ बनते. मधुमेहाच्या रुग्णांनाहे फळ खाल्याने काही खास फायदे मिळतात. हे फळ पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. यामुळे मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...