spot_img
अहमदनगरस्वातंत्र्यापुर्वी सुरू झालेली अहमदनगर मधील 'ही' शाळा झाली बंद? कारण आलं समोर..

स्वातंत्र्यापुर्वी सुरू झालेली अहमदनगर मधील ‘ही’ शाळा झाली बंद? कारण आलं समोर..

spot_img

गणेश जगदाळे | पारनेर;-
स्वातंत्र्यापुर्वी सुरू झालेल्या पिंपरी पठार येथील जिल्हापरीषदेच्या शाळेत या वर्षी फक्त एकच मुलगी असल्याने या गावातील शाळा अता बंद झाली आहे. गावात खूप वर्षापासून ग्रामपंचायत सुद्धा आहे. मात्र गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत मुलेच नसल्याने ही शाळा आता या वर्षी बंद करण्यात आली आहे. वाडी वस्तीवरील शाळा मुलांअभावी बंद झाली तर त्यात फारसे विशेष असे काही नाही. मात्र गावपातळीवरील शाळा बंद होणे हे बाब खेदजनक आहे. अशी गावपातळीवरील शाळा बंद होण्याची कदाचित ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटणा असावी.

पिंपरी पठार येथील जिल्हापरिषदेची शाळा स्वातंत्र्यापुर्वी म्हणजे १९४० साली सुरू झाली आहे. गावात ग्रामपंचायतही स्थापण होऊन सुमारे ७५ वर्षे होत आली आहेत. गावची लोकसंख्या सुमारे नऊशेच्या आसपास आहे. अशा गावातील या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यातील अनेकजण मोठ्या पदावर सुद्धा आहेत. (कै.) जी आर पाटील हे रयत शिक्षण संस्थेच प्राचार्य होऊन गेले. आहेत. बाळासाहेब शिंदे यांनी दिल्ली येथे संरक्षण खात्यात तंत्रज्ञ म्हणून काम केले आहे. तर सध्या अनेकांनी व्यावसा़य बँका, कंपन्या तसेच शिक्षक म्हणूनही काम केले आहे तर काही करत आहेत.

तालुयात जिल्हा परिषदेच्या ३३४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये १४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र तालुयातील पिंपरी पठार येथील शाळेत विद्यार्थीच नसल्याने ही शाळा या वर्षासाठी तरी बंद करण्यात आली आहे. ज्या गावात गेली अनेक वर्षापासून ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. अशा गावातील जिल्हा परिषदेची शाळा बंद होत आहे.ही अतीशय दुर्दैवी घटणा आहे.

तालुयात मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. अशा शाळांची शिक्षण फी सुद्धा सर्वसामान्य पालकांना न परवडणारी असते. मात्र अशा शाळांकडे पालकांचा व मुलांचा कल वाढल्याने सरकारी जिल्हापरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. त्यामुळे तालुयातील पिंपरी पठार सह ब्रम्हणदरा, गणेशनगर या तीन शाळा बंद झाल्या आहेत. तर आणखी सहा ते सात शाळांमध्ये पाच पेक्षा कमी पट असल्याने त्याही बंद होण्या्च्या मार्गवर आहेत. या उलट तालुयात पिंपरी जलसेन, देविभोयरे,पानोली,पवारवाडी (सुपे), यासारख्या आदर्श व विद्यार्थी संख्या प्रमाणापेक्षा अधिक असलेल्या शाळाही आहेत.

चौकट-
खाजगी शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नाही..
गावातील शाळा बंद होणे ही बाब अतीशय गंभीर आहे. या पुढील काळा आमच्या गावातील मुलांना शिक्षणासाठी शेजारील गावात दोन ते चार किलोमीटर अंतर चालून जावे लागणार आहे. गावातील अनेक मुले खाजगी इंग्रजी माध्यामाच्या शाळेत जात असल्याने येथे विद्यार्थी राहिले नाहीत. मात्र गोरगरीबांच्या मुलांना खाजगी शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ती मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहे.
-शितल पागीरे, माजी सरपंच.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यातील ‘ते’ धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या...

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

  Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...