spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation: गोळ्या घातल्या तरी माघार नाही! जरांगे पाटलांनी केले 'मोठे'आवाहन

Maratha Reservation: गोळ्या घातल्या तरी माघार नाही! जरांगे पाटलांनी केले ‘मोठे’आवाहन

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री-
Manoj Jarange Patil: आरक्षण मिळावे हीच गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे. आम्हाला गोळ्या घातल्या, हाणलं तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मुंबईत गेल्यावर आम्ही मागे हटणार नाही. सगळी शक्ती, सगळी ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे. तसं केलं नाही तर आमच्या पोरांचं वाटोळं होणार आहे. मराठा समाजाने आंदोलनासाठी सज्ज व्हा आणि सावध राहा. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.

मुंबईतल्या आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडेलेले दिसतील. कुणीही घरी बसू नका. आपण बसून राहिलो तर आपल्या मुलांचे हाल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकडे चला असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि ती सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत. असं असताना आम्हाला त्या युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात? असा प्रश्नही मनोजजरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला जे आरक्षण दिलं जाईल असं सांगितले जात आहे ते टिकणार आहे का? आम्ही ते नाकारलं नाही आम्हाला सगळं मान्य आहे. मात्र सरकारने सांगावं की ते टिकणार का? तसं होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा…

आमची भूमिका मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी आहे. आमच्या हक्काचं ते आरक्षण आहे आणि आम्हाला ते मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. जे हक्काचं आहे तेच आम्ही मागतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील वगैरे नेत्यांनी आमच्या बद्दल मागून बोलू नये. धरसोड मी नाही तर त्यांनी केली. त्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांची बैठक घेतली का? हे त्यांना विचारा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार म्हणतं आहे की २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल. त्यामुळेच आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे. जर सरकार २० तारखेच्या आत आरक्षण देणार असेल तर आम्हाला काहीही हौस नाही मुंबईला जाण्याची असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...