spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation: गोळ्या घातल्या तरी माघार नाही! जरांगे पाटलांनी केले 'मोठे'आवाहन

Maratha Reservation: गोळ्या घातल्या तरी माघार नाही! जरांगे पाटलांनी केले ‘मोठे’आवाहन

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री-
Manoj Jarange Patil: आरक्षण मिळावे हीच गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे. आम्हाला गोळ्या घातल्या, हाणलं तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मुंबईत गेल्यावर आम्ही मागे हटणार नाही. सगळी शक्ती, सगळी ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे. तसं केलं नाही तर आमच्या पोरांचं वाटोळं होणार आहे. मराठा समाजाने आंदोलनासाठी सज्ज व्हा आणि सावध राहा. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.

मुंबईतल्या आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडेलेले दिसतील. कुणीही घरी बसू नका. आपण बसून राहिलो तर आपल्या मुलांचे हाल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकडे चला असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि ती सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत. असं असताना आम्हाला त्या युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात? असा प्रश्नही मनोजजरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला जे आरक्षण दिलं जाईल असं सांगितले जात आहे ते टिकणार आहे का? आम्ही ते नाकारलं नाही आम्हाला सगळं मान्य आहे. मात्र सरकारने सांगावं की ते टिकणार का? तसं होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा…

आमची भूमिका मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी आहे. आमच्या हक्काचं ते आरक्षण आहे आणि आम्हाला ते मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. जे हक्काचं आहे तेच आम्ही मागतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील वगैरे नेत्यांनी आमच्या बद्दल मागून बोलू नये. धरसोड मी नाही तर त्यांनी केली. त्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांची बैठक घेतली का? हे त्यांना विचारा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार म्हणतं आहे की २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल. त्यामुळेच आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे. जर सरकार २० तारखेच्या आत आरक्षण देणार असेल तर आम्हाला काहीही हौस नाही मुंबईला जाण्याची असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...