spot_img
ब्रेकिंग...तर तुमचा सुफडा साफ होणार! जरांगे पाटील सरकारवर पुन्हा संतापले

…तर तुमचा सुफडा साफ होणार! जरांगे पाटील सरकारवर पुन्हा संतापले

spot_img

Manoj Jaraje Patil: लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार, मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करणार असा इशारा मनोज जराजे पाटील यांनी दिला आहे. ७ राज्यातील मराठे एकवटणार असून भावनेची लाट निर्माण होऊन तुमचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करणार, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. ते काल हिंगोलीत बोलत होते.

सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही. लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा. कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या. अन्यथा, कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार आणि निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखला आहे, असा गंभीर आरोप देखील मनोज जरांगेंनी केला. फडणणीस यांनी जर मला एसआयटी चौकशीत गुंतवून दाखवलं. तर मी त्यांची पाठ थोपाटणार, असं आव्हान देखील जरांगे यांनी दिलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....