spot_img
महाराष्ट्र...तर पश्चाताप होईल! मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

…तर पश्चाताप होईल! मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आंतरवाली सराटी येथील लाठीमाराबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात माहिती दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हे मागे घेतले नाही तर फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे विधानही त्यांनी केले.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते आमच्याविरोधात जाऊ लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ नाही लागणार.

महाराष्ट्रातला मराठा काय आहे, हे त्यांना लक्षात येईल. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे. एकदा २४ डिसेंबर होऊन जाऊ द्या, मग महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे, हे त्यांना दाखवून देऊ. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमचे आंदोलन शांततेतच होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू, असेही ते म्हणाले.

भुजबळांनी मर्यादा सांभाळून बोलावे

छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा होत आहे. याबद्दल जरांगे म्हणाले, त्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. भुजबळ घटनात्मक पदावर आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुर्‍हाडी-कोयत्याची भाषा करून जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये, नाहीतर पुढे त्यांना दाखवून देऊ.

फडणवीसांना रोषाला सामोरे जावे लागेल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जालन्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनाबाबत माहिती दिली. यात आंदोलकांपेक्षा पोलिस अधिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ लाठीमार केला होता, असेही ते म्हणाले होते. यावर जरांगे पाटील म्हणाले, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर नाही आले, तर त्यांना मराठा काय आणि महाराष्ट्र काय, हे लक्षात येईल. कुणाचे तरी ऐकून फडणवीस यांनी भूमिका बदलली, याचा त्यांना पश्चाताप होईल. फडणवीस यांना मराठे पुन्हा उघडे पाडणार, त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...