spot_img
अहमदनगरभर जत्रेत 'भयंकर' प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं...

भर जत्रेत ‘भयंकर’ प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं घडलं काय?

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री-
भर जत्रेत भयंकर प्रताप घडला आहे. लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये टोळक्याने केलेल्या कृत्याने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावं हादरलं आहे. जुन्या वादावरून सात आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून एका युवकाची हत्या केली.

अक्षय आपशेटे (वय २४, रा. शहर टाकळी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय दाबीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या वादावरून लक्ष्मी देवी मंदिराजवळ संशयित सात ते आठ जणांनी चाकू, सत्तुर, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी अक्षय संजय आपशेटे याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्यास भावाने व इतरांनी तातडीने खासगी रुग्णालय व तेथून शेवगाव येथे उपचारासाठी हलवले. परंतु प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहेत.

जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये आरोपींना पकडण्याची हमी दिल्यानंतर अक्षय याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...