spot_img
अहमदनगरभर जत्रेत 'भयंकर' प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं...

भर जत्रेत ‘भयंकर’ प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं घडलं काय?

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री-
भर जत्रेत भयंकर प्रताप घडला आहे. लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये टोळक्याने केलेल्या कृत्याने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावं हादरलं आहे. जुन्या वादावरून सात आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून एका युवकाची हत्या केली.

अक्षय आपशेटे (वय २४, रा. शहर टाकळी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय दाबीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या वादावरून लक्ष्मी देवी मंदिराजवळ संशयित सात ते आठ जणांनी चाकू, सत्तुर, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी अक्षय संजय आपशेटे याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्यास भावाने व इतरांनी तातडीने खासगी रुग्णालय व तेथून शेवगाव येथे उपचारासाठी हलवले. परंतु प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहेत.

जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये आरोपींना पकडण्याची हमी दिल्यानंतर अक्षय याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...