spot_img
अहमदनगरभर जत्रेत 'भयंकर' प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं...

भर जत्रेत ‘भयंकर’ प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं घडलं काय?

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री-
भर जत्रेत भयंकर प्रताप घडला आहे. लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये टोळक्याने केलेल्या कृत्याने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावं हादरलं आहे. जुन्या वादावरून सात आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून एका युवकाची हत्या केली.

अक्षय आपशेटे (वय २४, रा. शहर टाकळी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय दाबीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या वादावरून लक्ष्मी देवी मंदिराजवळ संशयित सात ते आठ जणांनी चाकू, सत्तुर, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी अक्षय संजय आपशेटे याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्यास भावाने व इतरांनी तातडीने खासगी रुग्णालय व तेथून शेवगाव येथे उपचारासाठी हलवले. परंतु प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहेत.

जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये आरोपींना पकडण्याची हमी दिल्यानंतर अक्षय याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...