spot_img
अहमदनगरभर जत्रेत 'भयंकर' प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं...

भर जत्रेत ‘भयंकर’ प्रताप! सात आठ जणांच्या टोळक्याच्या कृत्याने गावं हादरलं, नेमकं घडलं काय?

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री-
भर जत्रेत भयंकर प्रताप घडला आहे. लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये टोळक्याने केलेल्या कृत्याने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावं हादरलं आहे. जुन्या वादावरून सात आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून एका युवकाची हत्या केली.

अक्षय आपशेटे (वय २४, रा. शहर टाकळी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय दाबीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या वादावरून लक्ष्मी देवी मंदिराजवळ संशयित सात ते आठ जणांनी चाकू, सत्तुर, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी अक्षय संजय आपशेटे याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्यास भावाने व इतरांनी तातडीने खासगी रुग्णालय व तेथून शेवगाव येथे उपचारासाठी हलवले. परंतु प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहेत.

जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये आरोपींना पकडण्याची हमी दिल्यानंतर अक्षय याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...