spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: पिकअप चोरणार्‍या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या! 'असा' लावला सापळा

Ahmednagar Crime: पिकअप चोरणार्‍या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या! ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
घरासमोर उभा केलेला पिकअप चोरून नेणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरीची पिकअप व दुचाकी असा दोन लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संदीप आप्पासाहेब बर्फे व राहुल नवनाथ बर्डे (दोघे रा. आडगाव ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

खोसपुरी (ता. नगर) येथील रज्जाक सिकंदर शेख यांची पिकअप (एमएच १६ एई २४१४) त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस करत असताना त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती काढली असता तो पिकअप जोडमोहज (ता. पाथर्डी) येथे असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या पथकाने पिकअप व त्याची चोरी करणार्‍या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पिकअप चोरीसह आडगाव येथून दुचाकी (एमएच १६ सीएल ७४०५) चोरी गेल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी पिकअप, दुचाकी हस्तगत करून दोघांना अटक केली.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, किशोर जाधव, सुनील आव्हाड, विष्णु भागवत, भगवान वंजारी, केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...