spot_img
ब्रेकिंगफॉर्म्यूला ठरला!! ‘मविआ’ आघाडीमध्ये काँग्रेसला मिळणार 'इतक्या' जागा?

फॉर्म्यूला ठरला!! ‘मविआ’ आघाडीमध्ये काँग्रेसला मिळणार ‘इतक्या’ जागा?

spot_img

पुणे। नगर सहयाद्री
आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दौरे, सभा, जागा वाटप चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला असल्याची माहिती समोर आली आहे. मविआने जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरवला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार असून, त्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. मेरिटच्या आधारे सूत्र निश्चित केले केले असून, लवकरच ते जाहीर केले जाईल.

भाजप विरोधात लढणार्‍यांना सोबत घेण्यास काँग्रेस सकारात्मक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार, उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची दिल्लीत चर्चा होईल. दरम्यान, महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचे वाटप करण्यासाठी फॉर्म्युला दिल्लीत ठरल्याचे सुत्रांकडून समजते. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शयता आहे.

शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.

जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात २२ ते २३ जागांपासून होऊ शकते. मात्र, चर्चेअंती दोन्ही पक्ष किमान तीन जागांवर पाणी सोडण्यास तयार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...