spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल! आरोपींना मिळणार नाही जामीन, नेमकं घडलं...

अहमदनगरमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल! आरोपींना मिळणार नाही जामीन, नेमकं घडलं काय? पहा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
देशामध्ये सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. नव्या कायद्यानुसार अहमदनगरमध्ये रस्त्यात अडवून लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.

गणेश मोहन शिंदे व त्यांचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नव्या कायद्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

देशात सोमवारपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) ३(५), आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...