spot_img
अहमदनगरशहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना तपोवन रस्त्यावरील ढवण वस्तीवर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अमन हरीचंद्र सतनामी (वय २१ मुळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. सद्गुरू टॉवर, सुनील ढवण यांच्या विटभट्टीजवळ, तपोवन रस्ता) असे मयत युवकाचे नाव आहे. शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी खूनी परप्रांतीय युवक मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद (मुळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. तपोवन रस्ता) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेमंत रमेश भरव्दाज (वय २४ मुळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. तपोवन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबासह सुनील ढवण यांच्या विटभट्टी जवळ राहतात. त्यांच्या शेजारील खोलीत त्यांचा आत्याचा मुलगा अमन हरीचंद्र सतनामी तसेच दुसर्‍या खोलीत रामजी बलवंत निशाद व त्यांचा नातू मनीष ऊर्फ पुकु तिरती निशाद हे राहतात. ते सर्व जण बिगारी काम करतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्व जण जेवण करून घराबाहेर बसलेले होते. त्यावेळी शेजारी राहणारा मनीष निशाद मोठ मोठ्याने शिवीगाळ करत होता.

त्यामुळे फिर्यादीच्या आत्याचा मुलगा अमन हा मनीष याला तू मोठ्याने शिवीगाळ करू नकोस, आमच्या घरात महिला आहेतफ असे म्हणाला. त्याने अमन यांना देखील शिवीगाळ केले व घरात जावून चाकू आणला व तो अमन यांच्या पोटात मारून त्यांना जखमी केले. सदरची घटना घडल्यानंतर मनीष हा जवळच असलेल्या ऊसातून पळून गेला. जखमी अमन यांना फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सावेडीतील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉटरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...