spot_img
देशPolitics News: 'तो' सोहळा म्हणजे शो!! 'राम भक्तीची लाट...' राहुल गांधी यांचा...

Politics News: ‘तो’ सोहळा म्हणजे शो!! ‘राम भक्तीची लाट…’ राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा

spot_img

नवी दिल्ली-
देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदी यांचा शो होता. आमच्याकडे देशाला बळ देणार्‍या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. त्यांना अयोध्या प्रश्नी विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. अयोध्येला जाणार का, असे विचारले असता गांधी म्हणाले, मी भारत जोडो न्याय यात्रेत आहे. पक्षाने जो मार्ग ठरवून दिला आहे त्यात अयोध्या येत नाही. भारत जोडो न्याय यात्रेच्या मागे न्यायाचा विचार आहे.

युवकांना न्याय, स्त्रियांना न्याय, शेतकर्‍यांना न्याय, कामागारांना न्याय आणि समान भागिदारी हे पाच स्तंभ देशाला शक्ती देतील. पुढचा दीड महिना आम्ही हे स्तंभ देशासमोर ठेवणार आहोत. आम्ही विचारांची लढाई लढतो आहोत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपा, संघाचा विचार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे. इंडिया आघाडीकडे आज घडीला ६० टक्के मते आहेत. सगळे जग माझ्या विरोधात गेले तरीही मी माझा लढा सुरु ठेवणार, असेही राहुल गांधी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...