spot_img
देशPolitics News: 'तो' सोहळा म्हणजे शो!! 'राम भक्तीची लाट...' राहुल गांधी यांचा...

Politics News: ‘तो’ सोहळा म्हणजे शो!! ‘राम भक्तीची लाट…’ राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा

spot_img

नवी दिल्ली-
देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदी यांचा शो होता. आमच्याकडे देशाला बळ देणार्‍या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. त्यांना अयोध्या प्रश्नी विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. अयोध्येला जाणार का, असे विचारले असता गांधी म्हणाले, मी भारत जोडो न्याय यात्रेत आहे. पक्षाने जो मार्ग ठरवून दिला आहे त्यात अयोध्या येत नाही. भारत जोडो न्याय यात्रेच्या मागे न्यायाचा विचार आहे.

युवकांना न्याय, स्त्रियांना न्याय, शेतकर्‍यांना न्याय, कामागारांना न्याय आणि समान भागिदारी हे पाच स्तंभ देशाला शक्ती देतील. पुढचा दीड महिना आम्ही हे स्तंभ देशासमोर ठेवणार आहोत. आम्ही विचारांची लढाई लढतो आहोत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपा, संघाचा विचार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे. इंडिया आघाडीकडे आज घडीला ६० टक्के मते आहेत. सगळे जग माझ्या विरोधात गेले तरीही मी माझा लढा सुरु ठेवणार, असेही राहुल गांधी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय...

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....