spot_img
देशPolitics News: 'तो' सोहळा म्हणजे शो!! 'राम भक्तीची लाट...' राहुल गांधी यांचा...

Politics News: ‘तो’ सोहळा म्हणजे शो!! ‘राम भक्तीची लाट…’ राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा

spot_img

नवी दिल्ली-
देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदी यांचा शो होता. आमच्याकडे देशाला बळ देणार्‍या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. त्यांना अयोध्या प्रश्नी विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. अयोध्येला जाणार का, असे विचारले असता गांधी म्हणाले, मी भारत जोडो न्याय यात्रेत आहे. पक्षाने जो मार्ग ठरवून दिला आहे त्यात अयोध्या येत नाही. भारत जोडो न्याय यात्रेच्या मागे न्यायाचा विचार आहे.

युवकांना न्याय, स्त्रियांना न्याय, शेतकर्‍यांना न्याय, कामागारांना न्याय आणि समान भागिदारी हे पाच स्तंभ देशाला शक्ती देतील. पुढचा दीड महिना आम्ही हे स्तंभ देशासमोर ठेवणार आहोत. आम्ही विचारांची लढाई लढतो आहोत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपा, संघाचा विचार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे. इंडिया आघाडीकडे आज घडीला ६० टक्के मते आहेत. सगळे जग माझ्या विरोधात गेले तरीही मी माझा लढा सुरु ठेवणार, असेही राहुल गांधी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...