spot_img
अहमदनगर'गोड' साखरेचा हंगामा 'कडवट', साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

‘गोड’ साखरेचा हंगामा ‘कडवट’, साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

spot_img

नगर सह्याद्री टीम-

यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत उसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, साखर कारखानदारांमध्ये उसाची पळवापळवी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अवघे तीन महिनेच कारखाने सुरू राहणार असल्याने साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढणार आहेत.

अवकाळी पाऊसाचा गाळप हंगामाला फटका

सार्वत्रिक अवकाळी पाऊस आणि पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उसाच्या फडांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. उसाच्या फडामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे ऊस तोडी यंत्रणा ठप्प झालेलीअसून परिणामी साखर कारखान्याच्या दैनंदिन गाळपावर परिणाम झाला आहे. गतवर्षी ८.६९ असलेला उतारा यंदा ७.८३पर्यंत खाली घसरला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन कमी होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन घटणार

राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू झाला. यंदा कारखाने १५० दिवसांऐवजी केवळ ९० दिवसच चालणार आहेत. मुळात यंदा ऊसाची लागवड कमी आहे. शिवाय अनियमित पावसामुळे वाढीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ऊस कमी असल्याने यंदा केवळ तीन महिने कारखाने सुरू राहण्याची अपेक्षा आहे. यंदा साधारणत: ९७० लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन कमी होणार आहे.

कारखानदारांवर ऊस घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला. पहिल्या महिन्यात गाळप आणि उत्पादन या दोन्हींमध्ये घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.अवकाळी पावसामुळे फडांमध्ये चिखल झाल्यामुळे ऊसतोड यंत्रणात जवळपास ठप्प झाली आहे. मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली तरीही दुष्काळजन्य संकटामुळे ऊस उत्पादन घटल्यामुळे साखर कारखानदारांवर ऊस घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची वेळ आली आहे. ऊस दर देण्याची कारखानदारांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...