पुणे नगर सहयाद्री:-
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सैफला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सर्जरी केल्यानंतर त्याला डॅाक्टरांनी ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिसार्च दिला. त्यानंतर संजय निरुपम यांनी एवढ्या लवकर डिसार्च कसा दिला असा प्रश्न उपस्थित केला होता.
यानंतर आता सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वतःच चाकू मारून घेतला की काय, अशी शंका असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून हल्लेखोर सापल्याने शंकला वाव नसल्याचे पवार म्हणाले.
मंत्री नितेश राणे यांनी अभिनेता सैफ अल्ली खानवर खरंच हल्ला झाला की तो अभिनय करतोय असा संशय व्यक्त केला होता. यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रतिक्रया विचारली असता त्यांनी याबद्दल कुठलीही संशयास्पद माहिती पुढे आली नसल्याचे म्हटले आहे.
मी राणेंशी बोलेन, पण हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेना वाव नसल्याचे अजित पवार नितेश राणेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. कालच नितेश राणे बंदर आणि इतर विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. पण, मला त्यांनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्यावर काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असे अजित पवार म्हणाले.