spot_img
अहमदनगरसाखर अनेकांना 'कडवट'! खासदार विखे यांचा विरोधकांना 'तिखट' टोला

साखर अनेकांना ‘कडवट’! खासदार विखे यांचा विरोधकांना ‘तिखट’ टोला

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्‍ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्‍याने सुरु आहे. दिवाळी निमित्‍त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्‍यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. राहाता शहरातही आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात खासदार विखे पाटील यांनी साखर वितरण करुन, उपस्थितांना दिपावलीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. गणेश परिसरातील ऊस उत्‍पादकांना २७०० रुपये भाव दिल्‍याबद्दल तसेच ५ कि.लो साखरेची भेट दिल्‍याबद्दल ग्रामस्‍थांच्‍या वतीने त्‍यांची लाडूतुला करण्‍यात आली.

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, गरीबांसाठी काम करण्‍याची शिकवण आणि संस्‍कार पद्मश्री आणि खासदार साहेबांनी दिला. तोच वारसा ना.विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुढे घेवून जाण्‍याचे काम विखे पाटील कुटूंबिय करीत आहे. सं‍कटात आणि आनंदात सर्वांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यातूनच कर्तृत्‍व आणि कर्तव्‍य सिध्‍द होते.

सामाजिक उपक्रमातून राजकारण नव्‍हे तर, सामाजिक बांधिलकी आम्‍हाला जोपासायची आहे असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. मात्र ज्‍यांना साखर मिळाली त्‍यांना काहीजन आता भेटतील सुध्‍दा अशा भेटणा-यांना विखे पाटलांची साखर कडू लागेल. आम्‍ही मात्र गोड साखर दिली असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....