spot_img
ब्रेकिंगदहावीची विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शुक्रवारपासून परीक्षेला सुरुवात, गैरप्रकार टाळण्यासाठी 'अशी' उपाययोजना

दहावीची विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शुक्रवारपासून परीक्षेला सुरुवात, गैरप्रकार टाळण्यासाठी ‘अशी’ उपाययोजना

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं असून परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

आज (दि. २९) माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे.

उद्या दहावीचा पहिला पेपर आहे परीक्षा अत्यंत तणावमुक्त व वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणार्‍या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

दहावीच्या परीक्षेला राज्यातील २३ हजार २७२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. ८ हजार ८१० दिव्यांग विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. सध्या बारावीचेही पेपर सुरु आहेत. दोन्ही परीक्षांसाठी तब्बल १ लाख ८० हजारांवर मनुष्यबळ कार्यरत राहणार असल्याचे राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...