spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: होमगार्ड पथकाच्या ट्रॅव्हल बसवर दगडफेक

Ahmednagar Crime: होमगार्ड पथकाच्या ट्रॅव्हल बसवर दगडफेक

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
सध्या देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता गेलेले होमगार्ड हे छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना त्यांच्या ट्रॅव्हल बसवर कोपरगाव तालुक्यातील समृद्धी मार्गावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून यात बसचे नुकसान झाले आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सैनिक यांना बंदोबस्त करता एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी नेआन करावी लागत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बंदोबस्ताच्या अनुशंगाने छत्रपती संभाजीनगर येथून ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता आलेले ४२ होमगार्ड यांनाठाणे येथून छत्रपती संभाजीनगर येथे सोडविण्याकरीता ट्रॅव्हल बसमधून चालेले होते.

परंतु रात्री (२२ मे) साडेबारा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पूल, समृध्दी हायवे रोडवर, कोपरगांव येथे अज्ञात इसमांनी ट्रॅव्हल बसच्या समोरील काचवर दगडफेक केली.या घटनेत बस चालक आश्पाक युसूफ शेख (वय ३७ वर्षे) हे जखमी झाले आहे. या प्रकरणी आश्पाक युसूफ शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात इसमां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस हल्लाखोरांचा शोध घेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...