spot_img
अहमदनगरअण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले...

अण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष केले होते. त्यावर अण्णा हजारे यांनी १०-१२ वर्षांनी जाग आली असल्याचे सांगत माझ्यामुळे तुमचे काही मंत्री घरी गेले होते असे म्हटले होते. त्यावर आता यामध्ये उडी घेत अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब झाले, असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पुढे असेही म्हटले, २०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही.

त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते, कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं होतं. रोहित पवार यांनी आता अण्णा हजारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यावर राज्यभरात टिकेची झोंड उठली आहे. आता अण्णा हजारे काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...