spot_img
अहमदनगरAhmednagar Crime:..म्हणून विवाहितेची आत्महत्या? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime:..म्हणून विवाहितेची आत्महत्या? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मुलबाळ होत नसल्याने छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना भिंगारमध्ये घडली. सुष्मा दीपक वैराळ (वय २५ रा. प्रबुध्दनगर, भिंगार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाराम मारूती रोकडे (वय ४८ रा. पाटण सांगली ता. आष्टी. जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पती दीपक मच्छिंद्र वैराळ, दीर अमोल मच्छिंद्र वैराळ, गौरव मच्छिंद्र वैराळ, सासू शालनबाई मच्छिंद्र वैराळ (सर्व रा. प्रबुध्दनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सदरची घटना शनिवार (दि. २०) सायंकाळी घडली असून रविवारी (दि. २१) दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. सुष्माचा विवाह दीपक वैराळ सोबत २०२० मध्ये झाला होता. सुष्मा सासरी नांदत असताना लग्न झाल्यानंतर सुमारे दीड वर्षांनंतर ते २० एप्रिल २०२४ सायंकाळी सात वाजेपर्यंत तिचा सासरी छळ करण्यात आला.

पती व इतरांनी तुला मुलबाळ होत नाही, तु वांजोटी आहे, तुझ्यावर उपचार करण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख रूपये घेवून ये’, असे म्हणून तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांच्या छळाला कंटाळून सुष्माने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुष्माच्या पतीसह चौघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...