spot_img
अहमदनगरAhmednagar Crime:..म्हणून विवाहितेची आत्महत्या? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime:..म्हणून विवाहितेची आत्महत्या? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मुलबाळ होत नसल्याने छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना भिंगारमध्ये घडली. सुष्मा दीपक वैराळ (वय २५ रा. प्रबुध्दनगर, भिंगार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाराम मारूती रोकडे (वय ४८ रा. पाटण सांगली ता. आष्टी. जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पती दीपक मच्छिंद्र वैराळ, दीर अमोल मच्छिंद्र वैराळ, गौरव मच्छिंद्र वैराळ, सासू शालनबाई मच्छिंद्र वैराळ (सर्व रा. प्रबुध्दनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सदरची घटना शनिवार (दि. २०) सायंकाळी घडली असून रविवारी (दि. २१) दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. सुष्माचा विवाह दीपक वैराळ सोबत २०२० मध्ये झाला होता. सुष्मा सासरी नांदत असताना लग्न झाल्यानंतर सुमारे दीड वर्षांनंतर ते २० एप्रिल २०२४ सायंकाळी सात वाजेपर्यंत तिचा सासरी छळ करण्यात आला.

पती व इतरांनी तुला मुलबाळ होत नाही, तु वांजोटी आहे, तुझ्यावर उपचार करण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख रूपये घेवून ये’, असे म्हणून तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांच्या छळाला कंटाळून सुष्माने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुष्माच्या पतीसह चौघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...