spot_img
ब्रेकिंगPolitician News:काँग्रेसला धक्का!! ५५ वर्षांचे जुने नाते संपवत 'यांचा' शिवसेनेत प्रवेश

Politician News:काँग्रेसला धक्का!! ५५ वर्षांचे जुने नाते संपवत ‘यांचा’ शिवसेनेत प्रवेश

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली संपवत आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले. मुख्यंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत काँग्रेसमधील सहकार्‍यांसह प्रवेश केला.

ते म्हणाले, माझे राजकारण सकारात्मक, रचनात्मक, विकासात्मक राहिले आहे. माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणे हे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे ध्येय मोठे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे व्हिजन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझे शिवसेनेशी नाते जुने आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं माझे वडील मुरली देवरा महापौर बनले होते. राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा एक विचारधारा आहे. १९६८ ची काँग्रेस, २००८ ची काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये अंतर आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक सूचनांना प्रतिसाद दिला असता तर मला हा निर्णय घ्यावा लागला नसता.

देवरा म्हणाले, काँग्रेस आज उद्योगपतींना देशविरोधी म्हणत आहे. मोदीजी जे सांगतात त्याच्या ते विरोधात असतात. केंद्रात आणि राज्यात मजबूत सरकारची आवश्यकता आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....