spot_img
ब्रेकिंगPolitician News:काँग्रेसला धक्का!! ५५ वर्षांचे जुने नाते संपवत 'यांचा' शिवसेनेत प्रवेश

Politician News:काँग्रेसला धक्का!! ५५ वर्षांचे जुने नाते संपवत ‘यांचा’ शिवसेनेत प्रवेश

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली संपवत आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले. मुख्यंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत काँग्रेसमधील सहकार्‍यांसह प्रवेश केला.

ते म्हणाले, माझे राजकारण सकारात्मक, रचनात्मक, विकासात्मक राहिले आहे. माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणे हे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे ध्येय मोठे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे व्हिजन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझे शिवसेनेशी नाते जुने आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं माझे वडील मुरली देवरा महापौर बनले होते. राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा एक विचारधारा आहे. १९६८ ची काँग्रेस, २००८ ची काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये अंतर आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक सूचनांना प्रतिसाद दिला असता तर मला हा निर्णय घ्यावा लागला नसता.

देवरा म्हणाले, काँग्रेस आज उद्योगपतींना देशविरोधी म्हणत आहे. मोदीजी जे सांगतात त्याच्या ते विरोधात असतात. केंद्रात आणि राज्यात मजबूत सरकारची आवश्यकता आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...