spot_img
अहमदनगरशरद पवार यांच्या पक्षाचे परिवर्तनाचे आवाहन म्हणजे मतदारांची दिशाभुल, दहा जागा लढविणारी...

शरद पवार यांच्या पक्षाचे परिवर्तनाचे आवाहन म्हणजे मतदारांची दिशाभुल, दहा जागा लढविणारी तुतारी परिवर्तन कसे करणार?; भाजप नेत्याचा सवाल

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
लोकसभेत बहुमतासाठी किमान २७२ जागा आवश्यक असतात. संपुर्ण देशभरात केवळ १० जागा लढविणारया राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) पक्षाचे ‘परिवर्तनाचे आवाहन’ म्हणजे मतदारांची दिशाभुल करण्याचा प्रकार आहे, असे मत भाजपाचे नेते विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केले.

काल नगरच्या गांधी मैदानात महाविकास आघाडीची प्रचार सभा झाली. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ व अनुभवी नेते उपस्थित होते. त्यामध्ये १० जागा लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे , १८ जागा लढविणारया शिवसेना (उबाठा) चे व उत्तर महाराष्ट्रात केवळ एक जागा लढविणारया काॅन्ग्रेस पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते.लोकसभेच्या एकुण ५४३ जागांपैकी बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता असते, याची या मंडळींना संपुर्ण जाणीव असताना “देशात परिवर्तनासाठी आम्हाला निवडून द्या.”,असे आवाहन करुन त्यांनी एक प्रकारे मतदारांची दिशाभूलच केली आहे.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष २३० जागांवर तर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी,आप ऄआयडिएमके असे अन्य प्रादेशिक पक्ष प्रत्येकी ३०/४० जागांवर निवडणूक लढवित असुन एकमेव भारतीय जनता पक्ष ४५० पेक्षा जास्त जागा लढवित आहे. त्यामुळे इंडि आघाडीतील पक्ष सत्तेवर येण्यासाठी नव्हे तर फक्त नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठीच निवडणूक लढवित असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.

एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कणखर व एकमुखी नेतृत्व तर दुसरीकडे ‘आपला समन्वयक ही ज्यांना लवकर निवडता आला नाही ” अशी विस्कळीत इंडि आघाडी,असे चित्र आहे. अशावेळी मतदारांनी प्रादेशिक पक्षांच्या भुलथापांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वाला मतदान करावे, व पाच दहा जागा लढविणार या पक्षाला मतदान करुन आपले मत वाया घालवू नये,” असे आवाहन श्री.विनायकराव देशमुख यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...