spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना दिलासा, बाजार समितीतील 'तो' निर्णय मागे; सभापती म्हणाले..

शेतकऱ्यांना दिलासा, बाजार समितीतील ‘तो’ निर्णय मागे; सभापती म्हणाले..

spot_img

अहमदनगर । नगर सह्याद्री

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर बाजार समितीतील भाजीपाला व कांदा विभाग शनिवारी (दि.४) बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटल्याने हा बंद मागे घेण्यात आला असून बाजार समितीतील सर्व व्यवहार शनिवारी सुरळीत सुरु राहणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) बंदची हाक दिली होती. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार होता. मात्र गुरुवारी (दि.२) रात्री मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याबाबतची घोषणा केलेली आहे.

त्यामुळे शनिवारी मार्केट बंद ठेवून काही साध्य होणार नाही. यामुळे मार्केट सुरू ठेवणे बाबत फळे भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांचे समवेत मोबाईलद्वारे संपर्क साधून चर्चा झालेली आहे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे सभापती बोठे यांनी सांगितले.

तरी सर्व अडतदारांनी आपल्या आपल्या दुकानावरील हमाल,मापाडी यांना संपर्क करून आडत दुकान चालू असले बाबत सर्वांना कळवावे. तसेच फेसबुक, व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनाही जास्तीत जास्त प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात यावी. तसेच शेतकर्‍यांनीही आपला शेतमाल विक्रीसाठी शनिवारी बाजार समितीत आणावा असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाजीपाला फळफळावळ आडते असोसिएशन अध्यक्ष अशोकराव लाटे आदींनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस अन पुरामुळे कहर! सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन….

नगर सह्याद्री बेव टीम : सध्या ईशान्येकडील भागात खूप विनाश झाला आहे. आसामपासून ते सिक्कीम,...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय म्हणाले पहा

आता निघणार घाम | १२ जूनपासून मान्सून सक्रीय होणार मुंबई | नगर सह्याद्री देशातील शेती आणि...